डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार कोळी, ढोर, टोकरे कोळी, डोंगर कोळी, कोळी महादेव, कोळी मल्हार भिल्ल, ठाकूर, पारधी, कातकरी अशा ४७ जमाती आदिवासी साठी पात्र आहेत.
काही आदिवासी घर भेदयांनी ४७ आदिवासी जमातींमध्ये भांडणे लावली. स्वतःच्या स्वार्थासाठी खऱ्या खोट्यांच्या वाद निर्माण केला. जात पडताळणीच्या नावाखाली आदिवासींची कत्तल केली. पिढ्यान पिढ्या बरबाद करून टाकल्या. आदिवासी दादा तुझं कसं रे जिन, पशु वाणी जिन आणि तसंच मरणं, स्वार्थी पुढाऱ्यांनी आपापसात भांडण लावून बघ केला कहर, सजले त्यांचे बंगले आणि आला बहर. तुझ्या जीवनात खऱ्या खोट्यांचे त्यांनीच घातलं जहर. आदिवासींच्या योजनांचा नावाखाली, जे जे आलं तेथे पसार झालं. आदिवासी आदिवासी भांडत बसले आहेत. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ अशी अवस्था झाली आहे. आदिवासी आता तरी अज्ञानाच्या झोपेतून येऊ दे रे जाग.*