अकोला येथे आज दि.८/जून/२०२३ रोजी, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री.यांना जिल्हाधिकारी अकोला यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले आहे की,मानवतेला काळीमा फासणारी आणि महाराष्ट्राला हादरुन टाकणारी घटना मुंबईत सावित्रीबाई फुले मुलींची वस्तीग्रह या ठिकाणी घडली,अकोल्यातून शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या बौद्ध तरुणीवर बलात्कार करून तिची अत्यंत कुरपणे करण्यात आली,
सावित्रीबाई फुले मुलींची वस्तीगृह मुंबई येथे राहणारे कॉम्प्युटर इंजि.शिकत असलेली अकोला येथील अनुसूचित जातीच्या मुलीवर बालात्कार करून तिची निर्घुण पणे हत्या करण्यात आली त्या ठिकाणच्या बेजबाबदार कर्मचारी व अधिकारी यांना सहआरोपी करण्यात यावे व हा तपास सी.बी.आय.कडे देण्यात यावे,बनावट चौकीदार बनून त्या वस्तीगृहात घुसला आणि तिची हत्या केली, तो कर्मचारी त्या वस्तीग्रहाचा नाही, त्याचा कुठेही वस्तीगृहात रेकॉर्ड नाही, त्या मुलीचा खून कसा झाला त्यामध्ये कोणकोणते कर्मचारी सहभाग आहेत याची शहानिशा झाली पाहिजे,या महाराष्ट्रात राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले,माता रमाई, अहिल्याबाई यांच्या लेकीची जर अशी निर्घुण हत्या विद्येच्या मंदीरात होत असेल तर ही मुली कुठे जातील.ज्या कोणी हत्यामध्ये शामिल असेतील त्या सर्वांना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी आमची मागणी या घडलेल्या घटनेचा जाहिर निषेध,तात्काळ आरोपी अटक करा हे केस फास्ट्रैक कोर्ट मध्ये सादर करा.राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले,माता रमाई, अहित्याबाई च्या लेकीना न्याय मिळाला पाहिजे,पुन्हा अशी घटना घडू नये देशाचे पंतप्रधान व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी या घडलेल्या घटनेची गांभीर्यान दखल घ्यावी, दलितांवर अत्याचार होत आहे गृहमंत्री मुख्यमंत्री होश मध्ये नाही, महाराष्ट्राला संतापून सोडणारे अशा घटना महाराष्ट्रात घडत आहेत अशा घटना पुन्हा घडल्याने पाहिजेत आणि जो कोणी आरोपी असेल त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशीच आम्ही मागणी करतो,गृहमंत्री होश आओ मुख्यमंत्री होश आओ, विद्यार्थ्याला न्याय द्या अन्यथा या महाराष्ट्रात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही हाच आम्ही इशारा देतो,सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य, निवेदन देता वेळेस सर्व बौद्ध समाज संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले,